पाऊस....प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय...! स्वैर,स्वच्छंदी....कधी हवाहवासा,तर कधी नकोनकोसा वाटणारा..! कधी लहान,खोडकर मुलासारखा उनाड,अचानक धो धो कोसळणारा..तर कधी नवयुवती सारखा लाजाळू,रिमझिम बरसणारा..
कधी तो जिवाभावाचा सखा होऊन आपल्याबरोबर बागडत राहतो,कधी प्रीयकर होऊन घट्ट बिलगतो,तर कधी वैरी होऊन जन्माची अद्दल घडवतो...
त्याची अशी अनेक रूपं...अनेक रंग...एकमेकांपासून भिन्न,तरी एकमेकांशिवाय राहू न शकणारे..
त्याचा प्रत्येक थेंब काहीतरी सांगत असतो..झाडांना,प्राण्यांना,पक्ष्यांना,माणसांना...त्याची रिमझिम अबोलपणे खूप काही बोलून जाते...आणि हा पाऊस जो खर्या अर्थाने जगतो ना..त्यालाच कळतो या निरर्थकपणे बरसणार्या पावसामागे दडलेला अर्थ...
अदिती जोशी